मुंगी उडाली आकाशी
संत मुक्ताबाईंचा हा एक कुट अभंग आहे, त्यामुळे याचे निरूपण करणे तसे अवघड आहे. या अभंगातून त्या जे कधीच शक्य नाही ते पण शक्य होते, असा सांगायचा प्रयत्न तर करीत नाही ना …!, असा प्रश्न मनात उभा राहतो. मनुष्याच्या कल्पना शक्तीच्या किती तरी पलीकडे, मनुष्याच्या आभासी ज्ञानाच्या पलीकडे त्यांची अलभ्य विचार शक्ती आहे, हेच यातुन समजते. "मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला विंचू पाताळासी जाय शेष माथा वंदी पाय माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताई हासली... संत मुक्ताबाईचा या अभंगातून जे असंभवनीय ते संभवनीय झाले. अशक्य गोष्ट शक्य झालेली आहे, हे गुढ सांगत आहे. अशा आश्चर्य चकित करणाऱ्या घटना घडल्यामुळे त्यांना स्वतःला हसू येत आहे. 'देखोनी मुक्ताई हासली’ अशक्य कोटीतलं घडलंय जे विनोदी आहे, ते पाहून त्यांना हसू येतंय.या रचनेचे अनेक अर्थ लावले जाऊ शकतील. "ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या, अगा जे घडलेची नाही, तयाची वार्ता पुससी काई मिथ्या" - अस्तित्वात नसलेल्या मायेने (मुंगीने), सूर्याला (ब्रह्म जाणिवेला/ ज्ञानाला ) गिळून टाकले असं सांगायचं तर मुक्ताई प्रयत्न...